52) खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
गावाकडील भाषेत बोलायची लाज का वाटते? जी बोली जिभेवर बसलेली आहे आणि जो मला व्यक्त होण्यासाठी सर्वात प्रिया अशा बोलीबद्दलचा गौरव व आनंद आपण का लपवतो, याचा विचार जरा गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे, घर आधी, शाळा नंतर ही पायरी आपण का विसरतो आहोत? माणसाचा पहिला आवाज व्याकरणातून निघत असतो? बोलीतूनच सर्वांचा पहिला हुंकार वा पहिला ध्वनी बाहेर आलेला आहे. 'सुधारणा' या फसव्या शब्दाच्या दबावाखाली जिभेवरच्या बोली संकटात आलेल्या आल्या आहेत, हे आपण का विसरतो आहोत.
बोलीभाषा जतनासाठी सारासार विचार झाला पाहिजे. देशातील खेडूतानी, श्रमवंतांनी, तेथील वयोवृद्धानी बोली सांभाळल्या आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. प्रमाण भाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, संवाद आणि संभाषण बोलीला जे अग्रस्थान आहे. ते प्रमाणभाषेला देता.. येत नाही. शिवाणाचे वजना, न्याकारणाची माप, साधारतेच्या अटी आणि प्रमाणीकरणाचे तर जे लिखित भाषेला चिकटलेले दिसतात, त्यापासून बोली मुक्त आहेत. 'बोली चांगली असते हे वाक्यच मुळात फसवे आहे. कोणतीच भाषा वाईट असू शकत नाही. शुद्ध-अशुद्धतेचीही मुद्दा भाषेत गौण ठरला पाहिजे. ग्रामीण गपसप, ओव्या, गाणी किंवा लोकसाहित्याचा इतका देखणा, मनमुराद सौख्य देणारा उच्चारभवणांचा मेवा हा तर मुळात बोलींनी उबरलेला बहरलेला आहे. सध्या तर चित्रपटवाले, मालिकावाले अस्सल प्रदेश, बोली, संवाद, गाणी, वाये याकडे लोहचुंबकाप्रमाणे आकृष्ट झालेले दिसतात. यातच बोलीचे सारे यश आणि बोलीची अगम्य ताकद सामावलेली आहे. अखेर हेच की, जनतेच्या जिभेवर खेळती असणाऱ्या बोलीला जगात तोड असूच शकत नाही.
पहिला ध्वनी कोठून बाहेर येतो ?
Wow! You thoroughly included everything with your post. I want to read more by you. Do you have any other blogs?