आजच्या चालू घडामोडी (Current Affairs in Marathi): २४ एप्रिल २०२५

 मित्रांनो चालू घडामोडी हा विषय तसा पाहता खूप विस्तृत आणि खूप मोठा विषय आहे. तुम्ही UPSCची तयारी करत असाल किंवा MPSC ची पोलीस भरती असो तलाठी भरती सर्व परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा विषय .यामध्ये नेमकं कुठून सुरुवात करावी हे समजत नाही. Lokmat,Loksatta,Sakal,पुण्यनगरी, लोकराज्य(Lokrajya Magzine),योजनाद हिंदूइंडियन एक्सप्रेसमहाराष्ट्र टाइम्स आणि राज्य शासन आणि भारत शासनाच्या महत्त्वाच्या योजना नेमकं काय वाचावं आणि काय सोडून द्यावा हेच समजत नाही.

त्यासाठी तुमच्या मदतीसाठी फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी वरील महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर हे क्वीज म्हणजेच प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.आशा आहे याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हालाही माहिती आवडली असेल तर या आमच्या पेजला Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) बुकमार्क करून घ्या आणि दररोज भेट द्या .

स्पर्धा परीक्षा तयारीत यश मिळवायचंय? मग चालू घडामोडी नक्कीच लक्षात ठेवा!

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

मुख्य घडामोडी:

भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे?
  1. पाकिस्तान
  2. चीन
  3. अमेरिका
  4. बांगलादेश

उत्तर:(A) पाकिस्तान

सिंधु पाणी वाटप करार : हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेला नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भातला करार आहे. सिंधु नदी आणि तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात जागतिक बँकेच्या पुढाकाराने दोन देशांत करार करण्यात आला. जवळपास दहा वर्षे वाटाघाटी झाल्यानंतर उभय देशांनी पाकिस्तानात कराची येथे १९ सप्टेंबर १९६०ला स्वाक्षऱ्या केल्या. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तर पाकिस्तानतर्फे अध्यक्ष अयुब खान यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारातील तरतुदींनुसार सिंधु, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी, बियास व सतलज या पूर्वेकडच्या नद्यांच्या पाण्याबाबत भारताला सर्व अधिकार असतील. याशिवाय पश्चिमेकडच्या नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी २० टक्के पाणी उपलब्ध आहे.
IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
(A) हार्दिक पंड्या
(B) तिलक वर्मा
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा

उत्तर:(D) रोहित शर्मा

आयपीएलमध्ये खेळाडूंद्वारे सर्वाधिक षटकार आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. आणि त्याच्या विध्वंसक फलंदाजीची बरोबरी करून त्याच्या 357 षटकारांच्या अतुलनीय विक्रमाला स्पर्श करण्यापर्यंत इतर कोणताही क्रिकेटपटू कधीच सक्षम असेल अशी शक्यता नाही
फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
  1. झू जिनेर
  2. कोनेरु हम्पी
  3. नुरगुल सलीमोवा
  4. पी वैशाली

उत्तर:कोनेरु हम्पी

२०२४-२०२५ च्या FIDE महिला ग्रांप्री ही सहा बुद्धिबळ स्पर्धांची मालिका आहे जी केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती, ज्याने २०२६ च्या महिला उमेदवार स्पर्धेत खेळण्यासाठी दोन खेळाडू निश्चित केल्या. उमेदवार स्पर्धेतील विजेती महिला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत २०२६ च्या विद्यमान विश्वविजेत्याशी खेळेल .
केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI careers for women अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे?

(A) इन्फोसिस
(B) गुगल
(C) TCS
(D) Microsoft

उत्तर:(D) Microsoft

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि मायक्रोसॉफ्टने महिलांसाठी एआय करिअर्स सुरू करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे – उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये करिअर करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक अग्रगण्य कौशल्य उपक्रम. या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश महिलांना उद्योग-संलग्न एआय कौशल्यांनी सुसज्ज करून, डिजिटल अर्थव्यवस्थेत अर्थपूर्णपणे सहभागी होण्यास आणि भारताच्या नवोन्मेष-नेतृत्वाखालील वाढीमध्ये सक्रिय योगदान देण्यास सक्षम करून उदयोन्मुख तंत्रज्ञानातील लिंगभेद भरून काढणे आहे.

Microsoft सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे?

(A) कृषी
(B) गृह
(C) संरक्षण
(D) कौशल्य विकास मंत्रालय

उत्तर:(D) कौशल्य विकास मंत्रालय

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि मायक्रोसॉफ्टने महिलांसाठी एआय करिअर्स सुरू करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे – उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये करिअर करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक अग्रगण्य कौशल्य उपक्रम. या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश महिलांना उद्योग-संलग्न एआय कौशल्यांनी सुसज्ज करून, डिजिटल अर्थव्यवस्थेत अर्थपूर्णपणे सहभागी होण्यास आणि भारताच्या नवोन्मेष-नेतृत्वाखालील वाढीमध्ये सक्रिय योगदान देण्यास सक्षम करून उदयोन्मुख तंत्रज्ञानातील लिंगभेद भरून काढणे आहे.
पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो?


(A) २३ एप्रिल
(B) २१ एप्रिल
(C) २४ एप्रिल
(D) २२ एप्रिल

उत्तर:(C) २४ एप्रिल

राष्ट्रीय पंचायती राज दिन हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा राष्ट्रीय दिवस आहे जो दरवर्षी २४ एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो.

भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

(A) ऑपरेशन टिक्का
(B) ऑपरेशन राहत
(C) ऑपरेशन त्रिशूल
(D) ऑपरेशन ब्रह्मा

उत्तर:(A) ऑपरेशन टिक्का

कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे?


(A) बिहार
(B) झारखंड
(C) गोवा
(D) महाराष्ट्र

उत्तर:(D) महाराष्ट्र

लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे?


(A) भारत
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) दक्षिण आफ्रिका

उत्तर:(C) चीन


PDF डाउनलोड (Today’s Notes in PDF)

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


Daily चालू घडामोडी क्विझ – स्वतःला तपासा!

पूर्ण क्विझ येथे सोडवा


महत्त्वाचे:

  • टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा: Join Now
  • दररोज नोट्स, क्विझ, आणि अपडेट्स मिळवा
  • मित्रांना शेअर करा – अभ्यास सोपा करूया!

ही माहिती उपयुक्त वाटली? आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि दररोज येथे भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *