NMMS : नागरिकशास्र सराव पेपर | NMMS Question Paper Test series 2025-26

NMMS Question Paper Test series 2025-26

पेपर सोडवून झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

0%
0 votes, 0 avg
68

नागरिकशास्त्र सराव पेपर

टेस्ट सोडवण्यासाठी START बटनावर क्लिक करा आणि टेस्ट कशी वाटली ते नक्की comment करा.👇👇👇👇👇

1 / 30

महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहेत?

(1) 288

(2) 250

(3) 78

(4) 29

2 / 30

लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे ----

(1)परमादेश

(2) मनाई हुकूम

(3) अधिकारपृच्छा

(4) बंदी प्रत्यक्षीकरण

3 / 30

कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे -

(1) परमादेश

(2) प्रतिषेध

(3) देहोपस्थिती

(4) अधिकार पृच्छा

4 / 30

कराविषयीचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडले जातात.

(1) लोकसभा

(2) राज्यसभा

(3) विधान परिषद

(4) न्यायालय

5 / 30

शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा.

(1) जिल्हाधिकारी

(2) महापौर

(3) तहसिलदार

(4) महानगरपालिका आयुक्त

6 / 30

पैशांसंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात ?

(1) लोकसभा

(2) राज्यसभा

(3) विधानपरिषद

(4) स्थायी समिती

7 / 30

भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत?

(1) 24

(2) 23

(3) 25

(4) 26

8 / 30

खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

(1) कायदेमंडळ कायदयांची निर्मिती करते,

(2) कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.

(3) न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते.

(4) कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तीन ही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते.

9 / 30

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थ संकल्पाविषयीचे अधिवेशन....येथे होते.

(1) मुंबई

(2) नागपूर

(3) औरंगाबाद

(4) पुणे

10 / 30

भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकिय स्वरुप सारखेच आहे, अपवाद आहे फक्त.......

(1) झारखंड

(2) आसाम

(3) जम्मू आणि काश्मीर

(4) अरुणाचल प्रदेश

11 / 30

भारताचे ....... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

(1) राष्ट्रपती

(2) उपराष्ट्रपती

(3) प्रधानमंत्री

(4) सरन्यायाधिश

12 / 30

राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी ..... सदस्य विविध घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात.

(1) 250

(2) 12

(3) 288

(4) 238

13 / 30

खालीलपैकी कोणता विषय संघशासन व राज्यशासन दोन्हींकडे आहे?

(1) संरक्षण

(2) चलन व्यवस्था

(3) शिक्षण

(4) तुरुंग प्रशासन

14 / 30

लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

(1) जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड.

(2) सदस्यांची संख्या निश्चित असते.

(3) सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो.

(4) निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात.

15 / 30

भारतात 28 घटकराज्ये असली तरी विधानसभांची संख्या..... आहे

(1) 29

(2) 30

(3) 31

(4) 32

16 / 30

राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

(1) दर दोन वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात.

(2) सदस्यांची संख्या 250 असते.

(3) सदस्याच्या कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

(4) जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते.

17 / 30

खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च यायालयाचे नाही?

(1) केंद्रशासन व घटकराज्य यांच्यातील तटे सोडवणे

(2) न्यायाधिशांची नेमणूक करणे

(3) नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करणे

(4) राष्ट्रपतीनी सल्ला विचारल्यास देणे

18 / 30

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखीत नाही ?

(1) अमेरिका

(2) भारत

(3) इंग्लंड

(4) रशिया

19 / 30

खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही?

(1) विधेयकाचे कायद्यात रुपांतर करणे.

(2) विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे.

(3) कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे.

(4) मंत्रिमंडळातील सदस्य ठरविणे,

20 / 30

नोकरशाहीत विसंगत असलेले काम ओळखा.

(1) कायदा व सुव्यवस्था राखणे.

(2) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.

(3) निवडणूकीत उभे असणाऱ्या उमेदवाराना मदत करणे

(4) कर गोळा करुन सरकारी तिजोरीत जमा करणे

21 / 30

मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रदेशासाठी नाही?

(1) महाराष्ट्र

(2) दादरा नगर हवेली

(3) गोवा

(4) अंदामान निकोबार बेटे

22 / 30

कराविषयीचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडले जातात.

(1) लोकसभा

(2) राज्यसभा

(3) विधान परिषद

(4) न्यायालय

23 / 30

चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडविले जातात ?

(1) फौजदारी

(2) दिवाणी

(3) कामगार

(4)लष्करी

24 / 30

महाराष्ट्र विधानसभागृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते ?

(1) 250

(2) 288

(3) 78

(4) 60

25 / 30

कोणत्या शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपण े परस्परांवर अवलंबून नसतात ?

(1)संसदीय
(2) समाजवाद
(3) अध्यक्षीय
(4) लष्करी राजवट

26 / 30

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या ..... वयाची वर्षे पूर्ण असले पाहिजे.

27 / 30

मध्यावधी निवडणुका म्हणजे

(1) दर पाच वर्षानी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका

(2) संसद सदस्याने राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या निवडणुका

(3) आणीबाणीच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका

(4) मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका

28 / 30

केंद्रिय मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या....
टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले.

29 / 30

संविधानसभेच्या सूचनेनुसार मुळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम यांनी केले.

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(2) सरदार वल्लभभाई पटेल

(3) डॉ. राजेंद्र प्रसाद

(4) पं. जवाहरलाल नेहरु

30 / 30

संविधानाने 'शिक्षण' या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे?

(1) संघ सुची

(2) शेष सुची

(3) समवर्ती सुची

(4) राज्य सुची

Your score is

The average score is 31%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *