राजर्षी शाहू महाराज

जन्म : शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. जे कागल परगण्याचे जहागीरदार होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते.

१७०८ साली कोल्हापूर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेथील चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले.

शिक्षण

-कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते. तर मि. फिटझिराल्ड हे त्यांचे मुख्य शिक्षक होते. १८८५ मध्ये महाराजांना राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यांचे लहान बंधू श्रीमंत बापूसाहेब, श्रीमंत काकासाहेब व दत्ताजीराव इंगळे हे महाराजांसोबत शिक्षण घेत होते. १८८९ पर्यंत ते राजकोटला होते. त्यावेळी त्या महाविद्यालयाचे महप्रिन्सिपल मॅकनॉटन हे होते.
१८९० ते १८९४ या काळात महाराजांचे शिक्षण धारवाड येथे पूर्ण झाले. या ठिकाणी सर स्टुअर्ट फ्रेझर व सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस हे त्यांचे गुरु होते.
महाराजांनी इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभार या विषयांचे शिक्षण घेतले. १८८९ मध्ये इंग्रजांनी सर स्टुअर्ट फ्रेझर यांची नियुक्ती महाराजांचे ट्यूटर व गार्डियन म्हणून केली. ते १८९४ पर्यंत या पदावर होते..

विवाह – धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी महाराजांचा विवाह झाला. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या बडोद्याचे गुनाजीराव खानविलकर यांची कन्या होती. विवाहाच्या वेळी त्या ११ वर्षाच्या होत्या.

राज्याभिषेक (२ एप्रिल १८९४) – २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली.. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (६ मे १९२२) एकूण २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

वेदोक्त प्रकरण (ऑक्टोबर १८९९)

नियमित प्रथेप्रमाणे ऑक्टोबर १८९९ साली महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत राजारामशास्त्री भागवत, बंधू बापूसाहेब व मेहुणे मामासाहेब खानविलकर ही मंडळी होती. महाराजांचे स्नान सुरू असताना नारायण भटजी हे स्वतः स्नान न करता वेदोक्तऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. राजारामशास्त्री यांनी ही बाब महाराजांच्या लक्षात आणून दिली. महाराजांनी त्याचे कारण विचारल्यावर वैदिक मंत्राच्या वेळी स्नानाची आवश्यकता असते. शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात. म्हणून मला स्नानाची आवश्यकता नाही. असे त्याने उत्तर दिले, पण आपण शूद्र नाहीत तर क्षत्रिय आहोत असे महाराजांनी म्हटल्यावर नारायण भटजीने ब्राह्मण वर्ग जोपर्यंत तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्र आहात. अशी भूमिका घेतली.हे उत्तर महाराजासाठी धक्कादायक होते. या धार्मिक अन्यायाची महाराजांना चीड आली. या घटनेमुळे महाराज विचारप्रवण व चितनशील बनले. अधिकाधिक सामाजिक सुधारणाकडे ते वळले.

>नोव्हेंबर १९०१ मध्ये राजघराण्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावे, असा आदेश महाराजानी काढला. यावेळेस राजघराण्याचे विधी करण्याचे वार्षिक ३०००० इनाम आप्पासाहेब राजोपाध्याय यांना मिळाले होते. पण राजोपाध्याय यांनी नकार दिला. त्यांचा नारायण भटजीच्या मतास पाठिंबा होता. त्यामुळे शाहू महाराजांनी १ मे १९०२ रोजी त्यांचे इनाम का जत करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली. पण राजोपाध्याय यांना कोल्हापुरातील सनातनी ब्राह्मण व लोकमान्य टिळकांचा पाठिंबा असल्याने त्यांनी महाराजांची टिंगल सुरु केली.

अखेर ६ मे १९०२ रोजी महाराजांनी राजोपाध्याय यांना नोकरीवरून काढून टाकले व त्यांचे वतन रद्द केले. त्याच्या फेरविचाराची मागणी देखील शाहूनी फेटाळली. राजोपाध्याय याने झाज प्रतिनिधी कर्नल फेरीस, मुंबई सरकार व लॉर्ड कझनकडे तक्रार केली, पण सर्वांनी त्यांचा अर्ज फेटाळला.

हे वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन गट तयार झाले राजोपाध्याय यांना लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, महादेव बोड्स बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर व महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांनी पाठिंबा दिला. टिळकांनी तर केसरीत महाराजांच्या विरोधात लेख लिहिला. टिळक यांनी प्रस्तुत लेख आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी लिहिला असे म्हटले होते. शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी तात्याराव जोशी यांची २५० रुपये वेतनावर नियुक्ती केली.

> वेदोक्तांच्या हक्काची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी देखील केला होत त्याची माहिती प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजाना दिली होती. तेव्हा याच विषयावर ग्रंथ लिहिण्याची सूचना महाराजांनी ठाकरे यांना केली. म्हणून मग ‘प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी’ हा ग्रंथ ठाकरेंनी लिहिला.

सत्यशोधक समाजाची स्थापना (१९११)

धनंजय किर म्हणतात, वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या मतप्रणालीकडे वळले. कर्मवीर विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे १९१०मध्ये सभा होऊन सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना झाली होती.शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार परशराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूर येथे भरलेल्या समेत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या समाजाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची निवड झाली. धनगर समाजाचे विठ्ठल विराजी ढोणे हे शिक्षक राजवाड्यावर नोकरीस होते. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे काम करण्यासाठी ढोणे यांची नियुक्ती केली. त्यांचे वेतन मात्र दरबार देत असे.


शाहू महाराजांनी समाजाला इमारत बांधण्यासाठी गंगावेशीत चार गुंठे जमीनही देणगी म्हणून दिली. येथे इमारत व्हावी म्हणून इमारत बांधकामास मदत केली. विठ्ठल ढोणे, हरिभाऊ चव्हाण व श्रीपतराव चव्हाण यांनी खेड्यात फिरून निधी जमवला. शाहूंनी देखील हरिभाऊ चव्हाण यांनी वास्तुशांती, पुरुषसूक्त, संध्या, आवणी, विवाह, श्राद्ध यांची पुस्तके तयार केली.

भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार सत्यशोधक समाजाने दोन-तीनशे विवाह व अनेक धार्मिक विधी केले. खेडोपाडी चळवळीचा प्रसार झाला. महाराजांनी सत्यशोधक समाजास वर्षासन सुरू केले.जुलै १९१३ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू केली. विसाजी ढोणे याच्याकडे ही शाळा सोपवली. या शाळेत तयार झालेल्या पुरोहितांनी अनेक विधी केले.

१९१९ साली साताऱ्यातील काले येथे सत्यशोधकसमाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेथे भाऊराव पाटलांनी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापण्याचे जाहीर केले ३१ डिसेंबर १९५९ व १ जानेवारी १९२० या दोन दिवशी कराड येथे सत्यशोधक समाजाची परिषद दीनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेस शाहू महाराजांनी मदत केली होती.

सत्यशोधक समाजाचा हीरकमहोत्सव १९३३ मध्ये झाला. त्यावेळी एक ग्रंथ भाई माधवराव बागल यांनी प्रसिद्ध केला. जरी शाहू हे सत्यशोधक समाजाचे अधिकृत सभासद झाले नव्हते तरी ‘सत्यशोधक शाहू’ असेच त्यांचे वर्णन या ग्रंथात करण्यात आले आहे.


शाहू महाराज हे सत्यशोधक नव्हते, असे मत स. मा. गर्गे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, य. दि. फडके, नलिनी पंडित यांचे होते, पण उपलब्ध पुरावे ते सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते है दर्शवितात,

आर्य समाजाची स्थापना (१९१८)


आर्य समाजात वैदिक पद्धतीने धार्मिक विधी करणे व जातिभेद न मानणे यावर भर असल्याने महाराज या समाजाकडे आकर्षित झाले. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. डी. टी. मालक यांना आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून नेमले.डा.. बाळकृष्ण, प्रा. अविनाशचंद्र बोस व पंडित नारायणशास्त्री वालावकर यांनी आर्य समाजाचे काम केले. कोल्हापूर येथे समाजाचे गुरुकुल सुरू करण्यात आले.१९१८ साली महाराजांनी राजाराम महाविद्यालय, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल आणि पाटील तलाठी क्लास या संस्था आर्य समाजाच्या ताब्यात दिल्या.

१९२६ मध्ये छत्रपती राजाराम यांनी या संस्था पुन्हा संस्थानाकडे घेतल्या.महाराजांनी गुरुकुलात कर्नल वूडहाऊस या नावाने अनाथालय स्थापन केले. कोल्हापूरमध्ये गुरुकुलच्या शैक्षणिक कार्याबरोबर धार्मिक क्षेत्रातही चांगले काम आर्य समाजाने केले. लोकजागृतीसोबत शुद्धी चळवळ देखील राबवली. महाराजांनी शाळेमध्ये ‘सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथाच्या अभ्यासाची सक्ती केली. या काळात दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर हे आर्य समाजाचे केंद्र होते. पन्हाळा तलावाजवळ आर्य समाजाच्या शाखांची मोठी वसाहतव निर्माण झाली होती.

शाहू महाराजांनी स्वतःला ‘मी आर्यसमाजी आहे’ असे घोषित केले होते ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज यांच्या तुलनेत आर्य समाजाचा महाराजांवर
अधिक प्रभाव होता. कुलकर्णी वतने नष्ट केली (१५ सप्टेंबर १९१८)

कुलकर्णी हा गावाच्या शेतजमिनीची नोंद ठेवत असे. है कुलकर्णी शेतकन्यांवर अन्याय करत. सावकारी करत. महाराजांनी १५ सप्टेंबर १९१८ रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली व त्या जागी तलाठ्यांची नेमणूक केली.

नाराज झालेल्या कुलकण्र्यांनी त्याविरुद्ध करवीर पिठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे तक्रार केली. कुलकर्णी चळवळ सुरू केली. या चळवळीस कुर्तकोटी, लोकमान्य टिळक, प्रा. विजापूरकर, विष्णू गोविंद, दत्तोपंत बेळवी व भालाकार भोपटकर यांनी पाठिंबा दिला. या काळात शाहूच्या निषेधाच्या सभा झाल्या.

“माझ्या इनामी गावी तरी कुलकर्णी वतने खालसा करू नका, नाहीतर मी राजिनामा देईल,” अशी त्यांनी महाराजांना धमकी दिली होती, पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर डॉ. कुर्तकोटी यांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी शंकराचार्य पदाचा राजिनामा दिला. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण > प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी व ती शाळा त्या गावात बहुसंख्येने असणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी, असे महाराजांनी १९१३ मध्ये जाहीर केले होते. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव दरबाराने २५ जुलै १९१७ रोजी केला. त्याप्रमाणे सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण ३० सप्टेंबरपासून सुरू होईल, असा जाहीरनामा महाराजांनी ८ सप्टेंबर १९१७ रोजी काढला. या जाहीरनाम्यावर हंगामी महसूल अधिकारी भास्करराव जाधव यांची सही होती.

या शिक्षण योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी शाहूंनी समिती नेमली. त्या समितीवर रा. ब. हरी करमकर, कृष्णाजी धोंडो मराठे, प्रा. पंडितराव व विष्णुपंत काळे ही मंडळी होती. समितीने शिक्षण खाते हे महसूल खात्याचाच एक भाग मानावा असे ठरविले.
या समितीने आपला अहवाल शिक्षणाधिकारी स. ब. डोंगरे यांना सादर केला. २१ व २९ सप्टेंबर १९१७ रोजी असे जाहीर केले, की सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची ही योजना मुलींच्या बाबतीत लागू करण्यात येणार नाही. ती कोल्हापूर शहर, तालुक्यांची पेठांची, आणि माहलांची मुख्य गावे यात सुरू होईल. (धनंजय किर यांचे याबाबत म्हणणे होते, “धरण आणि कालवे यांच्यावर खूप खर्च झाला होता. पैशांच्या अभावी ते ही योजना मुलींच्या बाबतीत लागू करू शकत नव्हते. ” )

या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले म्हणजे ७ ते १४ वयाची ठरविण्यात आली. या वयातील मुलांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठविणे बंधनकारक होते. तसे न केल्यास प्रत्येक महिन्यास दोन पैसे दंड आकरण्यात यावा. असे आदेश काढले. मंदिर बांधताना शेजारी शाळेच्या खोल्या पण बांधाव्या असा नियम होता.

पहिली शाळा चिखली (पेटा करवीर) येथे १८ मार्च १९१८ रोजी स्थापन केली. १९१८ मध्ये २७ शाळांमधून १८९६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. १९२२ मध्ये ही संस्था ४२० शाळा व २२००० विद्यार्थी एवढी झाली होती.

शाहू महाराज म्हणाले होते, “प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. “

विद्यार्थी वसतिगृह

१८९६ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा शाहू महाराजांनी सर्व जातीजमातींच्या विद्याथ्र्यांसाठी वसतिगृह काढले. त्याचे नाव मराठा बोर्डिंग. सुरूवातीला यात सर्व जातींचे विद्यार्थी होते, पण नंतर यात जातीयता पाळण्यात येऊ लागली. परिणामी फक्त ब्राह्मण विद्यार्थी तेथे शिल्लक राहिले. अखेर ते वसतिगृह १९११ मध्ये बंद केले.

या अनुभवामुळे सर्व जातींसाठी एकच वसतिगृह काढले तर त्यात जातिभेदामुळे मुले येणार नाहीत म्हणून जातवार वसतिगृह काढली. शिक्षणाचा प्रसार जसा जास्त होईल तसा जातिभेद कमी होईल व नंतर अशी जातीय वसतिगृहे काढण्याची गरज पडणार नाही, असे त्यांना वाटत होते. महाराजांनी कोल्हापूरमध्येच नव्हे तर पुणे, नगर, मुंबई, पंढरपूर, नाशिक व नागपूर येथील वसतिगृहांना देखील आर्थिक मदत केली. शाहू महाराजांनी १९०१ पासून जातवार वसतिगृह काढण्यास सुरुवात केली.

शाहू महाराजांनी १५ एप्रिल १९२० रोजी नाशिकच्या ‘उदोजी स्टुडंट्स होस्टेलची पायाभरणी केली.
स्त्री शिक्षण

संस्थानातील शिक्षणाधिकारी असलेल्या मिस लिटल या मायदेशी गेल्यावर महाराजांनी फिमेल स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवकर यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमले.

संस्थानात ठिकठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शाळा काढल्या. मुदरगडसारख्या डोंगराळ भागात मुलींच्या शाळा काढल्या. हमार मुलींना दरबाराने शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. राजाराम विद्यालयातील सर्व मुलींना शिक्षण मोफत केले. रखमाबाई केळवकरांची मुलगी महाराजांच्या मदतीने वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लडला जाऊ शकली. तसेच महाराजांची विधवा सून इदुमतीदेवी यांना परिवाराचा विरोध असतानाही सोनतळी कॅम्पवर शिक्षण दिले.

व्यावसायिक व उच्च शिक्षण


तांत्रिक शिक्षणासाठी ‘जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था” स्थापन केली. यामध्ये लोहारकाम, गवंडीकाम व सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जात होते.
लष्करी शिक्षणासाठी ‘इफट्री स्कूल’ सुरू केले.

शिक्षकासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण काळात २० शिक्षकांना भाषा, अंकगणित, अध्यापन पद्धतीचे शिक्षण देण्यात येत असे. पाटील व ‘तलाठी’ स्कूल सुरू केल्या. यात त्यांना प्रशिक्षण देण्याची
व्यवस्था करण्यात आली..

१८५१ मध्ये कोल्हापूर येथे झाजी शाळा सुरू झाली होती. तिचे रूपांतर १८८१ मध्ये राजाराम महाविद्यालयात झाले. दरवर्षी ५० हजार रुपये खर्चासाठी या महाविद्यालयास संस्थानातर्फे देण्यात येत होते. हे महाविद्यालय महाराजांनी
आर्य समाजाकडे सोपविले होते

क्षात्रजगद्गुरु पीठाची स्थापना (१९२०)


महाराजांनी करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉ.कुर्तकोटी यांची नेमणूक केली होती, पण कुलकर्णी चलने नष्ट केली तेव्हा त्यांचे महाराजांशी न पटल्याने ऑक्टोबर १९१८ मध्ये त्यांनी पदत्याग केला. यानंतर आत्मशास्त्री चित्रे हे करवीरचे शंकराचार्य झाले.
ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी १९२० मध्ये कोल्हापुरात ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल’ ची स्थापना केली.
यात ६२ विद्याथ्र्यांनी प्रवेश घेतला होता.

पारगाव येथे मौनी महाराजांचे मीठ होते. मौनीबुवा हे क्षत्रिय संत व शिवाजी महाराजांचे गुरू होते. ते मराठ्यांचे जगदगुरू होते. या गादीचे पुनरुजीवन करण्याचे महाराजांनी ठरवले. शाहू छत्रपतींनी सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडिकर यांची पाटगावच्या धर्मपीठावर क्षात्रजगदगुरू म्हणून नेमणूक केली. ११ नोव्हेंबर १९२० रोजी पाटील यांचा वैदिक मंत्राच्या घोषात पट्टाभिषेक करण्यात आला. स्वतः शाहूनी, ए. बी. लट्टे आणि इतर दरबारी लोकांनी त्यांना वाकून मुजरा केला. भास्करराव जाधव यांनी मुजरा केला नाही. ‘पगड़ी गेली व पटका आला एवढाच फरक आहे असे ते म्हणत.

वि. रा. शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील यांना हा निर्णय आवडला नव्हता. क्षात्रजगदगुरु पीठाची निर्मिती हा निर्णय सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वाच्या विरोधी होता म्हणून सत्यशोधक मंडळी नाराज झाली. देव व माणूस यांच्यातील मध्यस्थ फुले यांनी नाकारला होता. पण या पीठाची निर्मिती करून महाराजानी त्या विचाराचे उलंघन केले, असा आक्षेप घेतला जातो.

श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल या ब्राह्मणेतर पत्र संपादकांनी शाहूचे समर्थन केले.

राजर्षी शाहू महाराज व अस्पृश्योध्दार

१. शिक्षण.
शाहू महाराजांनी अस्पृश्यासाठी असलेल्या शाळांची संख्या वाढवली. त्यांना फी माफीची सवलत दिली. कोल्हापुरात महार व चांभार यांच्यासाठी रात्रीची शाळा होती. महाराजांनी १९०६ मध्ये आदेश काढून या शाळेला कायमस्वरूपी मान्यता दिली. तसेच चांभार व ढोरांच्या मुलींच्या शाळेसाठी १९०७ मध्ये मंजुरी दिली. शाहू महाराजांनी १९०७ साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भास्करराव जाधव व इतर मंडळींनी १९०९ साली अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहाला जागा दिली. खासगी खर्चातून ३ (सोनतळी स्टेशन, बंगला व रुकडी) तसेच दरबारी खर्चातून ४ अशी एकूण ७ वसतिगृहे त्यांनी चालवली. कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क या युरोपियन विदुषी अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत होत्या. तिचे नाव जनतेपुढे राहावे यासाठी महाराजांनी अस्पृश्यांच्या वसतिगृहास ‘मिस क्लाक वसतिगृह’ असे नाव दिले.

राजाराम हायस्कूल व महाविद्यालयात अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याची भूमिका त्यांनी घेतली. प्रोत्साहनासाठी खास शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली. शाहूंनी आपले चिरंजीव प्रिन्स शिवाजीच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये खजिन्यात ठेवून त्या व्याजातून प्रत्येक अस्पृश्य विद्यार्थ्याला ५ रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली.

महाराजांनी २४ नोव्हेंबर १९११ रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली…

२. गुन्हेगारी जातीची हजेरी पद्धत बंद केली महार, मांग, रामोशी, बेरड, कोळी, गारुडी, पारधी जातींना गुन्हेगार ठरवून रोज पोलीस ठाण्यावर हजेरीचे बंधन त्यांना चालण्यात आले होते. २७ जुलै १९१८ रोजी एक आदेश काढून महाराजांनी हजेरीची पद्धत बंद केली. ३. महार वतने बंद केली महारांना मिळालेल्या इनाम जमिनीस हडकी हाडोळा म्हणत असत. त्यांच्या वतनाला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. उलट वतनामुळे महारामा पाटील, कुलकर्णी चौगुला व रयतेची चोवीस तास पडेल ती कामे करावी लागत. १९१८ मध्ये शाहू महाराजांनी ही वतने कायद्याने बंद केली. तसेच वेठ वरळ ही पद्धत देखील बंद केली. पुढे १९५८ मध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक कायदा करून महारकीच्या वतनाचा शेवट केला.

• राजदरबारातील मंडळींचे खासगी नोकर म्हणून त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या, त्यांचे अंगरक्षक महार होते. जातिवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. अस्पृश्यांना ‘सूर्यवंशी’ समजण्यात यावे असा त्यांनी हुकूम काढला. त्यांच्यातील पहिलवानांना ते ‘जाट पहिलवान’ म्हणत. तसेच चांभारांना सरदार व मंग्यांना पंडित असे म्हणत. लष्करी फडात २ महार, २ मांग आणि शहरातील पोलीस गेटवर १६ महारांची नेमणूक केली.

महाराजांच्या घोड्यांच्या तबेल्यात महार मोतदारांपैकी एक गंगाराम कांबळे होता. त्याने हौदातील पाणी घेतले तर हौद बाटला म्हणून सवर्णानी त्यास मारहाण करून जखमी केले. महाराजांनी त्याला नोकरीतून मुक्त करून कोल्हापूर शहरात भरवस्तीत ‘सत्य सुधारक हॉटेल’ टाकून दिले. ते स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा, फराळ करत. राजांच्या मृत्यूनंतर गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरच्या एका बागेत त्यांचे स्मारक उभे केले.

कोल्हापूर नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते. कोणत्याही सरकारी खात्यात अस्पृश्यता पाळू नये, असा नियम त्यांनी केला. स्पृश्य-अस्पृश्य यांची सहभोजने घडवून आणली. ८ ऑगस्ट १९१८ रोजी एक हुकूम काढून कोल्हापूर संस्थानात अस्पृश्य तलाठी नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

५. मागासवर्गीयांसाठी आरक्षण शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मागासलेल्या लोकांसाठी शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा हुकूम २६ जुलै १९०२ रोजी काढला. प्रत्येक खात्याच्या प्रमुखाने या हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे, असे त्या हुकमात स्पष्ट म्हटले होते.

६. माणगाव परिषद (१९२०)
कोल्हापूरच्या माणगाव येथे २० व २१ मार्च १९२०रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. हिच माणगाव परिषद यासाठी शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला.
माणगाव परिषदेचे अध्यक्ष -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
या परिषदेच्या आयोजनासाठी कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉ. रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, गनाचारी, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे व निगप्पा एदाळे यांनी प्रयत्न केले. या परिषदेमधूनच बाबासाहेबांचे नेतृत्व उदयास आले.

अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर (३०,३१ मे व १ जून १९२०) – या परिषदेला दहा हजार लोकसमुदाय उपस्थित होता. नागपूरच्या एक्जबिशन ग्राऊंडवर हा कार्यक्रम झाला. या परिषदेला श्रीपतराव शिंदे यांनी शाहू महाराजांचे भाषण वाचून दाखवले

कामगार सीताराम केशव बोले यांनी मुंबईत पीपल्स
युनियन म्हणजे लोकसंघ स्थापन केला या संघटनेमागे शाहू महाराज यांचा हात होता

ब्राह्मणेतर चळवळ १९१७ च्या आसपास महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीचे प्रकटीकरण झाले. त्यात महाराजांची भूमिका महत्त्वाची होती. या चळवळीतील अनेक नेतृत्वाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध महाराजांशी होता. १९१९ ते १९२५ या काळात महाराजांनी मद्रासच्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते डॉ. माधवण नायर, सर पी. व्यागराज चेट्टी, सी. नरेश मुदलीयारा सर शंकरण नायर यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण केले होते


आर्थिक क्षेत्रातील कार्य उद्योग व व्यापार- १९०६ मध्ये ‘शाहू छत्रपती स्पिनिंग मिल’ची स्थापना केली. १९०७ मध्ये सहकारी तत्त्वावर कापड गिरणी सुरू केली. या गिरणीसाठी जागा मोफत दिली. कोल्हापूर पूर्वीपासून गुळासाठी प्रसिद्ध होते. १८९५ मध्ये महाराजांनी ‘शाहूपुरी’ या व्यापारपेठेची स्थापना केली. पुणे, मुंबईच्या व्यापाऱ्यांना कोल्हापुरात येण्यासाठी विविध व्यापारी सवलती दिल्या.

शेती शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराजांनी प्रथम प्राधान्य दिले. भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना १९०७ साली आखण्यात आली. १९०८ साली या धरणाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे करण्यात आले. तसेच राधानगरी व काळम्मावाडी धरणाची कामे हाती घेतली. शेतात नवनवीन प्रयोग व्हावेत, असे त्यांना वाटत होते. चहा व कॉफीच्या लागवडीवर त्यांनी भर दिला होता. सावकारी नियंत्रणात आणून शेतकऱ्यांना कर्जे दिली. जनावरे व पिकांचे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

दुष्काळ – १८९७ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यावर महाराजांनी प्रभावी उपाययोजना केली.

सहकार – १९१२ मध्ये कोल्हापुरात सहकार कायदा पास

कलांचे आश्रयदाते
महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला, शिकार, मल्लविद्या अशा कलांना आश्रय दिला. महाराजांना अनेक छंद होते. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी मराठीत ‘शिवचरित्र’ लिहिले, शाहू महाराजांनी स्वतः ‘सिद्धांत विजय’ हा ग्रंथ लिहिला ते स्वतः कुस्ती खेळत. गावागावात तालमी व आखाई यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले

> गायन कोकिळा केसरबाई केळकर, बालगंधर्व, नाटककार मामा वरेरकर, गोविंदराव टेंमें, बाबूराव पेंटर, कवी सुमंत यांना महाराजांनी आश्रय दिला. जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खान यांना कोल्हापूर दरबाराने आश्रय दिला. बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर या दोन बंधूनी १९१३ मध्ये कोल्हापूर येथे चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सिनेमा हे सिनेमागृह स्थापन केले. आबालाल रहिमान या काळातील प्रसिद्ध चित्रकार होता.

केंब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजाचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व क डॉक्टर लॉज ही मानद पदवी देऊन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *